केवळ भारताचा नव्हे, तर साऱ्या जगाचाच आरसा असलेले महाभारत पुन्हा पुन्हा वाचले, तरी नवी दृष्टी देऊन जाते. वि. ग. कानिटकर यांनी या पुस्तकात महाभारताची कथा रसाळ वर्णिली आहे. सर्व रसांचा समुच्चय असलेले महाभारत मानवी मने, भावभावना, नातेसंबंध, हिंसा आणि शांती आदींचे दर्शन घडवते.
कानिटकर यांनी आदिपर्व, सभापर्व, वनपर्व, विराट पर्व, उद्योग पर्व, भीष्म पर्व, द्रोण पर्व, कर्ण पर्व, शल्य पर्व, सौप्तिकपर्व, स्त्रीपर्व, शांतीपर्व व अनुशासन पर्व, अश्वमेथिक पर्व, आश्रमवासिक पर्व, मौसलपर्व, महाप्रस्थानिक पर्व आणि अखेरीस स्वर्गारोहण पर्व या भागांत कालानुक्रमे विभागले आहे. एका अलौकिक इतिहासाचे हे दर्शन.
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
पाने : ३८०
किंमत : ५०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)